Saturday, April 5, 2014

ध्यासपूर्तीतून निर्माण होतोय “मुक्काम पोस्ट धानोरी”


मुक्काम् पोस्ट् धानोरी (MPD) च्या निर्मितिची संकल्पना खुप् मनोरन्जक् आहे, संगणक् क्षेत्राशी निगडीत् दोन् मित्र सुदर्शन् वराळे व महेश् राजमाने हे MPD विषयी बोलताना सांगत् होते..आम्ही नेहमी हॉलीवुड्, बॉलीवुड्, टॉलीवुड् आणि अगदी जॅपनीज्, चायनीज् कोरि‌अन्, जागतिक्, आणि मराठी चित्रपटांची चर्चा करायचो. आमचा चित्रपट्निर्मितीचा ध्यासच् आम्हाला चित्रपट् निर्मितीच्या धाडसाकडे घे‌उन् गेला. अगदी अमेरिके मधील् चांगल्या पगाराच्या नोक-या सोडुन् भारतात् परतण्या पर्यन्तचा हा ध्यास् म्हणजे मित्र् म्ंडळी ना मुर्ख पणाचा नि्र्णय वाटला. पण् एक् ठरवीले होते, काही झाले तरी पुण्या मधे नोकरी करुन् अपले छन्द् आणि ध्यास् पु्र्ण करायचा.आणि हो निर्मितीची सुरुवात् ही कथेपासुनच् होते !

आम्ही खुप् लेखकांशी संपर्क् साधला, वेगवेगळ्या लोकांशी चर्चा केल्या. हे सगळं तेंव्हा चालु होत्, साधारण् २००९-२०१० मधे, जेंव्हा विनोदीकथा, प्रेमकथा आणि सामाजिक् आशयावरच्या कथा अगदी ढिगानी मिळत् होत्या. पण् एखादी अशी सरळ् कथा ज्यामधे साहस्/ धाडस् आणि थरारक् मनोरंजन् असेल्, मिळणं अगदी दुस्तर् , अवघड् दिसत् होतं. आणि यामुळेच् आम्हाला आमची कथा लिहिण्याची उर्मी मिळाली. यातुनच् एका छान् कथेने जन्म् घेतला ज्यामधे एक् ब्ंडखोर् मुलगी तिच्या दोन् मित्रांबरोबर् धानोरी नावाच्या एका दुरच्या खेड्यामधे फिरायला जाते.
यातल्या ब्-याचशा गोष्टींची चर्चा आम्ही पुण्याजवळच्या कोंढाणा किल्ल्याच्या पायथ्याशी बसुन् केली आहे. प्रत्येक् आठवड्याच्या शेवटी आम्ही जंगलामधे जा‌उन् बसायचो एक् रेकॉर्डर् सोबत् घ्यायचो आणि आमच्या कथेशी संदर्भित् चर्चा , वादविवाद् रेकॉर्ड् करायचो. एका कथेची पटकथा आणि त्यातुन् संपुर्ण् संहिता तयार् व्हायला जवळजवळ् ३ वर्षाचा काळ् लागला. पण् आता जेव्हा आम्ही मागे वळुन् बघतो तेंव्हा तो काळ् खुप् सुंदर् घालवला असं जाणवतं.
कथेमधल्या प्रत्येक् पात्राचं एक् वेगळं वैशिष्ठ्य् आणि महत्व् आहे आणि ते कथेमधे अगदी चपखल् बसलं आहे. चित्रपटाचे संवाद् अगदी अर्थपुर्ण् आहेत्. आणि कथा खुप् वेगवान् आहे म्हणजे कुठेही अर्थहीन्, रटाळ् दृष्य् दिसणार् नाहीत्. प्रत्येक् दॄष्य् कथेला पुढे नेण्यास् मदत् करतं. चित्रपटामधे खुप् सारे स्पेशल् इफ़ेक्ट्स् आहे आणि ते फक्त् क्रोमा नाहियेत् तर् ख्-या जगातल्या काही दॄष्यांचं ३ डी घट्क् वापरुन् मिश्रण् केलेलं आहे. आम्हाला अशी आशा आहे की असं काही प्रेक्षकांच्या लक्षातही येणार् नाही (आणि तरच् ते सर्वोत्तम् सी जी ठरेल् ना! )

या चित्रपटाच्या कथेची आणखी एक् जमेची बाजु म्हणजे ही तरुण् लोकांची कथा आहे, शहरामधल्या, कॉलेज् तरुणांची,आणि त्याच् वेळेला त्यामधे ग्रामीण् बाज् पण् आहे जो खेडेगावातल्या आणि त्याचबरोबर् शहरामधल्या प्रगल्भ् प्रेक्षकांना रुचेल्, आवडेल्. समाजामधल्या सगळ्या स्तरातल्या आणि भागातल्या लोकांना पटेल्, रुचेल् असा कथाविस्तार् करणं हे आमच्यासाठी खरंच् एक् मोठं आव्हान् होतं आणि मला असं वाटत् की आम्ही ते शिवधनुष्य् अगदी समर्थपणे पेलेलय्.
एकदा आमच्या हातात् चांगली कथा असल्यावर्, पुढची पायरी होती ती म्हणजे कथेला न्याय् देणारे कलाकार् मिळणे. एका बाजुला आम्हाला आमच्या टीमबरोबर् (कथालेखक्, दिग्दर्शक्, सहा.दिग्दर्शक् ) कथेचा उहापोह् करायचा होता की जेणेकरुन् कथेचे पटकथेत् रुपांतर् करायचे होते. ही एक् अशी स्थिती होती की आमची कथा एका विशिष्ट् वळणाने जाणं आवश्यक् होतं आणि प्रत्येक् प्रसंगात् कथेच्या अनुषंगाने जाणारी वळणे असायला हवी होती. (जर् उत्कर्षबिंदु एकच् असेल् तर् एकच् नाट्यमय् वळण्... ) आणि दुस्-या बाजुला कलाकारांचा शोध् घेण्याचं काम्.. या सगळ्यासाठी वर्तमानपत्रात् जाहिराती देणं, अभिनयाच्या कार्यशाळाशी संपर्क् साधणं वगैरे गोष्टी चालु झाल्या.

आमचा पहिलाच् चित्रपट् असल्यामुळे, आमच्यापुढे खुप् अनन्य् आव्हाने होती. आम्हाला कोणत्याही प्रस्थापित् कलाकाराबरोबर् जायच् नव्हतं याचं मुख्य् कारण् म्हणजे पुर्वग्रह्. प्रत्येक् नटाची एक् खुमारी असते आणि खरं तर् प्रेक्षकही त्याच्याकडे त्याच् प्रकाराने पहात् असतात्. (नट् आणि नटी हे दोनही यात् आले.) व्यक्तिरेखेच्या पुर्वग्रह् दुषित् नजरेतुन् प्रेक्षकांना बाजुला ठेवण्यासाठी आम्ही नव्या चेह्-यांचा शोध् घ्यायचं ठरवलं. त्याचवेळेला आम्हाला पैशाच्याही मर्यादा होत्या. कुठलही पुरेसं आर्थिक् पाठबळ् नसताना अगदी कमी बजेट् मधे चित्रपट् बनवण्याचा आमचा मानस् होता. (त्याबद्द्ल् सवीस्तर् नंतर्..)

आमचं मुख्य् पात्र् पुजा हिला काही मारामारीचे सीन् करायचे होते आणि त्यासाठी थोडसं मार्शल् आर्टचं प्रशिक्षण् घेतलेल्या अभिनेत्रीची गरज् होती. (आम्हाला आमचे फ़ा‌इट् सीन् आजिबात् मुर्खासारखे दिसायला नको होते,जे या ना त्या प्रकारे,विस्मयकारकरित्या,आपल्या चित्रपट् क्षेत्रात् चालुन् जातात्.) या सगळ्यात् , आणि ह्या दोन् वस्तुस्थिती, की आमचं कुठेही नाव् झालेलं नसताना आणि अगदी नविन् प्रोडक्शन् हा‌उस् असताना ऑडिशन् म्हणजे एक् दु:स्वप्न् होतं.. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी सातारा आणि पुण्यात् मिळुन् जवळजवळ् ५० ऑडिशन् घेतल्या.

आम्हाला तरुण् आणि चतुरस्त्र् नविन् चेहरे हवे होते, जे नविन् लोकांबरोबर् काम् करण्याची जोखिम् उठवायला तयार् होते. ६ महिने ऑडिशन् घेतल्यानंतर् आम्हाला आमच्या व्यक्तिरेखेशी जुळणारे चेहरे मिळाले.. या सहा महिन्याच्या कालावधीत् आम्ही आमची मुख्य् पात्रं ३ वेळा बदलली. त्यातले काही , जेव्हा आम्ही तालीम् चालु केली तेव्हा आमच्या अपेक्षेप्रमाणे त्या त्या व्यक्तीरेखांशी चपखल् बसले नाहीत् ,आणि काही जणांनी त्यांच्या वैयक्तिक् कारणांमुळे काम् सोडुन् दिले. वेळ् निघुन् चालला होता, पण् कामाचा दर्जा जास्त् महत्वाचा होता. आणि म्हणुनच् योग्य्, साचातल्या व्यक्तिरेखा मिळेपर्यंत् आम्ही तेव्हढा काळ् वाट् पाहिली. आम्ही कलाकारांबरोबर् संहितेचं वाचन् सुरु केलं, आणि आमचं प्रत्यक्ष् शुट् सुरु करण्यासाठी बळकटी आणली..

बऱ्याचअंशी मराठी चित्रपटात संस्मरणीय असे संवाद नसतात. पण मुक्काम पोस्ट धानोरी हा चित्रपट अशा संवादांनी अगदी पुरेपुर भरलेला आहे. हा सिनेमा मराठी इतिहासात अशा प्रकारचा पहिलाच सिनेमा असेल. ह्या चित्रपटाची मुख्य व्यक्तीरेखा ही एक तरुण मुलगी असली तरी तात्विकदृष्ट्या "कथा" हीच खरी नायक आहे त्या मुळे चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा ही आपलं अस्तित्व समर्थपणे मांडते.
यामधले स्पेशल इफ़ेक्ट्स असे आहेत की जे मराठी मधे तर कधीच झालेले नाहीत पण बॉलीवुड मधे सुद्धा आत्ता आत्ता दिसायला लागले आहेत. मागील एक पुर्ण वर्ष या चित्रपटाच्या केवळ स्पेशल इफ़ेक्ट्स वर काम चालु आहे. हे काम म्हणजे केवळ क्रोमा शुट करुन बॅकग्राऊंड बदलणं एव्हढ्च नसुन, ३डी गोष्टी निर्माण करुन त्या कॅमे-याबरोबरच्या फ़ुटेज बरोबर वापरल्या गेल्यात, एव्ह्ढच नाही तर चित्रपटातील पात्र त्यांच्याशी संवाद देखील साधतात. ब-याच ठिकाणी प्रेक्षकांना यातलं खरंखोटं ओळखुसुद्धा येणार नाही. यातले इफ़ेक्ट्स जरी अगदी उच्च तंत्रज्ञानातले असले तरी आमची पात्रं अगदी साधी आहेत.आणि हे दिग्दर्शकानी अगदी जाणुन बुजुन केलं आहे.

 परिस्थिती कितीही असामान्य असली तरी तिचा सामना करणारी माणसं ही सामान्यच अ्सतात. त्यांचं कर्तुत्व मात्र असामान्य वाटायला पाहिजे, आणि मुक्काम पोस्ट धानोरी मधे हे अगदी बरोबर साधलं गेलय. व्यावसायिक चित्रपटाचा झगमगाट या चित्रपटात अगदी दुर्मिळ दिसेल, पण कदाचित आजकाल व्यावसायिक चित्रपटाचं ज्याच्याकडे दुर्लक्ष होतय असे घट्क MPD मधे अगदी पुरेपूर आहेत.आणि यातला सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे प्रेक्षकांशी समरस होणं. यासाठी दिग्दर्शकद्वयीने सगळे कलाकार नविन घ्यायचे ठरवले. आज असे प्रयोग पडद्यावर आधीच यशस्वी झालेले दिसतायत.
MPD ची सगळी टीम नवीन लोकांची आहे, यातले स्पेशल इफ़ेक्ट्स देणारी सुदधा कॉलेजची मुलं आहेत, जे आपलं कॉलेज, अभ्यास सांभाळत हे काम करतायत. त्यासाठी आम्ही कॉलेजमधे जाऊन काही निवडक मुलं निवड्ली की जी तळमळीने या कामात स्वत:ला झोकुन देतायत आणि त्याचं फारच चांगलं परिणाम स्वरुप आम्हाला दिसुन येतय.

. चित्रपटामधे भरपुर action sequences आहेत. त्यासाठी आमच्या मुख्य पात्र सादर करणा-या कलाकारांना fight चं प्रशिक्षण घ्यावं लागलय. fight चे सगळेच प्रसंग अगदी वास्तववादी आहेत आणि त्यामुळेच ते सामान्य माणसाला अनुसरुन आहेत असं म्हणता येईल.
आता चित्रीकरण् संपलय् आणि चित्रपट् त्याच्या निर्मितीपश्चात् प्रक्रियेत् प्रदर्शनाच्या मार्गावर आहे, आम्ही सगळे त्याचा आस्वाद् घ्यायला अगदी उत्सुक् आहोत्. आम्हाला खात्री आहे की लोकांना या चित्रपटाची कथा नक्की आवडेल्. आमच्यासाठी मायबाप् प्रेक्षकच् सर्वकाही आहेत्. ते कदाचित् आम्हाला मुर्ख् ठरवतील् किंवा आम्ही मराठी चित्रपटाच्या इतिहासात् मैलाचा दगड् ठरु. आणि अम्हाला खात्री आहे की तसच् घडेल्.....
एकूणच मराठी तरुण आणि प्रगल्भ मनाला अश्या शैली चा चित्रपट हा अनुभवायला मिळणे हा दुर्लभ प्रकार ..म्हणून हा प्रामाणिक प्रयत्न..

Sunday, August 25, 2013

"But I lost My Prime Minster ": Madras Cafe - Mile Stone in its genre, MUST WATCH

1990 च्या दशकात ज्या काही राष्ट्रीय अंतर राष्ट्रीय घडामोडी झाल्या त्याचा अंदाज बांधणे आताच्या पिढीला तसे अवघड आहे. अखाती युध्द, सोवियत रशिया चा अस्त,जर्मनी चे एकीकरण, शीत युध्दा चा अस्त ह्या सर्व घटनांचा भारतावर प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष होणारा आर्थिक, राजकीय वा सामाजिक परिणाम. उदारमती धोरणंचा जगभर पाठपुरावा ही याच दशकात झाला, त्याचा एक भाग म्हणून माहिती व माध्यम यांचा अचानक होणारा मारा.आजूबाजूचे सगळे जगच बदलत होते. त्याच दरम्यान भारताचे राजकीय व सामाजिक वातावरण मंदिर - मशीद,मंडळ आयोग , बोफोर्से प्रकरणाने ढवळून निघाले होते. ह्या सर्व गदारोळ मधे भारताला 21 व्या शतका मधे घेऊन जाण्याचे स्वप्न तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी पहिले ; सर्व तरुण मनामधे एक अपेक्षाचं व उत्चाहाचा वातावरण तयार केल होत.
21 मे 1991 ला राजीव गांधी यांचा खून झाला आणि संपूर्ण देश हादरला, राजीव गांधी भारताचे एक अपूर्ण स्वप्न. ऑक्टोबर 1984 मधे इंदिरा गांधीची हत्या झाल्यानंतर त्यांना अनपेक्षितपणे देशाची धुरा सांभाळावी लागली. अतिशय विश्वासने देशा ला 21 व्या शतकाचे स्वप्न पाहत असता आजूबाजूच्या राजकीय दलदलि मधे ते केव्हा गुरफटले गेले ते कळता - कळता ५ वर्ष निघून गेली. सार्वत्रिक निवडणुका मधील पराभव व त्या नंतर विरोधी पक्ष म्हणून काम करताना त्यानी लोकांशी संपर्क करता करता आत्म् परीक्षण वा सार्वजनिक रीत्या आपल्या चुका लोका मधे जाऊन मान्य करायला चालू करत असता,लोकाना हा नेता आता पुन्हा जवळचा वाटू लागला.१९९१ च्या सार्वत्रिक निवडुणका मधे राजीव पुन्हा बहुमताने निवडून येण्याचे स्पष्ट भकिते होऊ लागली आणि इथेच "मद्रासकेफे" च्या कथानकाची बीजे रोवली जातात, आणि उलगडतो प्रवास एका षड्यंत्राचा / राजकीय खुनाच्या कटाचा. सामान्य माणसाला ज्या वेळी अश्या घटनांच दूरदर्शन,रेडियो,वृतपत्रे ह्या माध्यमातून आकलन होत ते त्याच्या जाणिवे ला झेपेल एवढ्या पुरते मर्यादित असते का ? का त्याचा एक, दुसरी किंवा अनेक बाजू असतात? राजीव गांधी यांच्या खुनाच्या कितीतर बाजू मद्रास केफे उलगडत नेतो. भारतीय गुप्तचर खात्याचे कार्य किंवा एकंदर अश्या संस्था चे काम कसे असते, हे आतापर्यंत हिंदी चित्रपटा मधे इतक्या प्रभावी पणे ह्या पुर्वी मांडल्याचे मला तरी आठवत नाही.पंतप्रधान पदाच्या पातळीवर राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत निर्णय कसे घेतले जातात ह्याचे विश्लेषण काही व्यक्तिरेखा व विक्रम सिंग या कथेच्या नायकाच्या द्वारे मांडले आहे. अंतर्गत राजकारणा पेक्षा राष्ट्रीय हीत कसे जोपासले जायला पाहिजे हे पश्चिम देशाना भारताच्या सीमे जवळ येण्यापासून प्रबंध घालण्यासाठी शांती सेना पाठीवन्यचा निर्णय हा कथेच्या ओघामध्ये अतिशय प्रभावी पणे प्रस्तुत केला आहे. भारत हा अस्वस्थ व कपटी शेजाऱ्यांनी वेढलेला देश आहे व ह्या सर्व front वर काम करत असता राजकीय नेतृत्व , गुप्तचर व सेना दले यांच्यावर राष्ट्रीय व अंतर राष्ट्रीय राजकारण व दबाव प्रभावी पणे मांडले आहे . राजकीय हत्ये मागे पश्चिमी गुप्तचर संघटना यांचा उल्लेख टाळला असला तरी दिग्दर्शकाने तो हुशार प्रेक्षका साठी पेरून ठेवला आहे.
सिनेमा ची सुरुवात विक्रम सिंग या आर्मी अधिकारी पासून सुरु होते , विक्रम सिंग ह्यास RAW ह्या भारतीय गुप्तचर संघटने द्वारे जाफना इथे एका खास mission वर पाठवले जाते. श्रीलंके मध्ये शांती प्रक्रिया चालू करून तिथे लोकशाही मार्गाने निवडणूक घेण्यासाठी अपेक्षित वातावरण व परस्थिती निर्माण करणे. LTF मध्ये फुट पाडून लोकशाही पर्याय निर्माण करणे हा मुख्य उद्देश. पण त्या प्रवास मध्ये उलगडणारा माजी पंतप्रधान हत्येचा कट, तो थांबिवाण्यासाठी गुप्तहेर अधिकाऱ्यांनी केलले प्रयत्न व त्याला आलेले अपयश .हा सर्व घटनाक्रम अतिशय प्रभावी व कुठेही कंटाळवाणा न होऊ देता दिग्दर्शकाने मांडला आहे. सिनेमा ची विक्रम सिंग हे व्यक्तिरेखा काल्पनिक असली तरी बराच सिनेमा हा सत्य घटना व बराच संशोधन करून मांडला आहे त्या मुळे कोठे ही नकली वाटत नाही. दशहत वादी नेतृत्व हे दशहतवादा च्या मानसिकतेच्या आहारी जाऊन लोकशाही चे सर्व मार्ग कसे बंद करत किंवा तसे करणे त्यांना अनेक कारण मुळे शक्य नसते सामान्य व निरपराध माणसांचा कसा बळी जातो व हे अंतर्भूत करण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे.
सिनेमा तांत्रिकदृष्ट्या अतिशय सक्षम झाला आहे , LTF चे बेस कॅम्प , ग्रह युद्धाच्या गडद छटा, कथा उलगडत जात असता आकाश्यातून भिरभिरणारी helicopters . आर्मी आणि LTF चे युद्ध आणि त्या वेळी केलेली कॅमेरा हंड्लिंग ,गुर्रीला युद्ध, वेगवेगळ्या locations वर उलगडणारा plot हा दृषां द्वारे व कोठेही शब्द बंबाळ न करता स्टोरी telling करताना दिग्दर्शकाचे कसब व प्रेक्षकांच्या बुधीमते वर टाकलेला विश्वास ह्या दोन्ही गोष्ठी जाणवतात. Hollywood च्या तोडीचे निर्मिती मुल्ये असणारा असा हा चित्रपट , कथेचा नायक शेवटी ज्या वेळी चर्च मध्ये पादरी च्या "पर जिते कौन ?" ह्या प्रश्नाला " पता नाही ,but I lost my prime minister ". असा म्हणतो त्या वेळी सामाजिक , आर्थिक,राजकीय ,राष्ट्रीय , अंतर राष्ट्रीय brutal राजकारणाच्या च्या अनुभुवा तून परत भारताला २१ व्या शतक कडे नेण्याच्या स्वप्नाचा अकाली अंत संवेदशील मनाला व नवीन पिढीला इतिहासाकडे वेगवेगळ्या अनुशंगाने पाहायला लावण्यचा एक प्रमाणिक व यशस्वी प्रयत्न होऊन जातो . नक्कीच पाहावा असा. एक अनुभव.

Tuesday, March 6, 2012

“Aghateet”:- My first Short Film

Technology, books and movies are my passion; movie making was more developed as a hobby latter in the time line .

Well making movie is very interesting and combination of people and technical activities which has its own unique challenges. So with cpl of friends Mahesh and atul on same interest we planned to work on one short movie which will be one room drama with minimum actors to reduce multi locations and multi ppl complexity, we seeded and developed one room thriller story of two brothers, appasaheb and balasaheb . After discussing for many days on lunch break with atul during my Symantec days and with Mahesh over the weekends and as and when possible , atul finally came up with final draft of script, it turned out to be good and as per expectations with minor logical loop holes in story and we decided to keep those as it is.

While working on script we had planned other making activities in parallel as to build technical team (?) and to have actors and is very important ingredient, we planned few auditions in pune and found actors as per our requirements reasonably good. Visited different related ppl to collect properties and for camera, lights and other stuff required…initially we thought we will be few ppl on location and shooting the film but on the day we exceeded more than 25 ppl.

Shooting Day:

Well it all had started to learn movie making process with minimum risk and investment, myself and atul started early in the morning in our cars separately to pick up properties; while driving to location atul got phone call on personal urgency and he had to left to address it for rest of morning session, meanwhile Mahesh collected furniture properties required from Girish T.’s home, it was very heavy and I can imagine the efforts they must have put to move it to locations.
Call timing was at 10 am and we slowly started gathering there. Trolley, lights, camera actors everything and we expected to take first shot by 11.00...ahaa and there you are; After blocking natural lights with black sheets and actors make up we were ready to take first shot on trolley by 2 PM. But we were too hungry for it and I and Mahesh managed to get food for entire crew.
By this time one of my friend madhu latane who had agreed to play role of appasaheb had time constraint and had to leave, thanks god atul came and he played the appasheab finally. Professional killer’s role played by sanjeev chandane one of my frind…so finally we finished with our first shot (scene) by 5 pm.
-----to be continue

Wednesday, July 13, 2011

last July was busiest

last July was busiest , was busy in reading lot. wrote more blogs in this month last year. this year too its busy but on different front. good to see back from here.

Thursday, May 5, 2011

कवि बोरकर यान्चि माफ़ी ग्रहित धरुन

देखणे ते चेहरे , जे Fair and Lovely चे ।
काळे की सावळे, छापिल मोल सर्वा सारखे ॥

तेच चेष्मे देखणे, जे कोन्डीती तीरप्या नजरा ।
वोळिती दु:खे प्रेमविरान्चे , सांडिती मधुशाला ॥

देखणे ते ओठ, की जे करीती धुम्र लीला ।
आणि ज्यान्च्या वलयाने वेढे संपुर्ण नभमंडला ॥

देखणे ते हाथ ज्यानी निर्मिले कानाखाली कानठळे ।
नंतर वाजले ते मंगलमय ध्वंनीचें कर्णमुखी सोहळे ॥

देखणी ती PARAGON, जी पाठीमागे चालती ।
वाळवंटातुन चालतो BATA , काय तमा ती झीजण्याची ॥

देखणा तो हातरुमाल , जो ये चेहरा स्वच्छ:तेला ।
लाभला छान साडे सहा रुपया,घाम टीपन्यास हा ॥

देखणा स्वप्नांन्त तो, जो ठायी बार प्यासा ।
Jony Walker (लाल,काळा,निळा) रेचुन जातो, प्रेमगर्भि चकना व शेंगदाणा ॥

--Sudarshan

Tuesday, April 19, 2011

Innovation

Adoption & usage of new technologies are coupled with social and cultural aspects. What is the Indian market’s potential to replicate mobile phones story for emerging new technologies we are expecting tomorrow. Well not tomorrow, for that matter in past also how many Indian universities, research and educational institute have given thought to modify PC technology to make its usage more effectively in rural part of India?

Technology is to be driven by needs within to bring the change to improve life equally as passion and vision to bring change drives technology. Is originality in vision to improve Indian life’s standard is what something we missing and blindly adopting technology development for someone else’s need? action to create supportive environment to cultivate innovative changes in day to day life is what missing from leadership at all level today , for example traffic regulation department I really doubt how much time and efforts senior officers and leaders put to improve bad traffic situations in many of cities today ? pulling ppl in to jobs and allow them to function discretely for whatever reasons without adding any value in to service they provide till they retire is what something leadership much bother today it seems.

I wonder if today’s leadership, in positive terms creates a sort of lobbies to get support from all levels in government and society to improve common man’s life, today we see lobbies are created to protect unlawful, antisocial and personal interests using governments money and power, but that’s not the point I am trying to make here. What I am trying to understand here is, what is required to be done at local level to change overall psyche to acquire leadership to lead and establish original thought process to improve billions of life in their own local context and at the same time connect them globally and collectively?

One of use case is I have worked with well-known multinational companies in my carrier, while performing my duties I have undergone many training on different management and cultural awareness programs and subjects designed from global team perspectives .Also being a technical person always in to understanding of problems statements for different business /financial and social model to provide solutions for those.

Training programs are good in rooms, they are really good. You come out of these rooms you are in real world where the cultural and social dynamics you deal with is local and little different, but to conference calls you go in with global team awareness.

Same with when you deal with technical problems to provide solutions .You have well defined structural and infrastructural patterns ready to learn, use and to support underlying structural/ infrastructural design. But you have to put efforts to understand business process/work-flow and transform those in bits and bytes and in to if –then-else’s. Somehow I don’t feel this allows you to work innovatively in natural way. You study functional aspect from defined requirements perspective and that’s one way to look at problem statement. Keeping rest of influential parameters in isolation can restrict one to provide more valuable innovative solution…. For example social networking could be one of influential parameters to be considered to provide more valuable solutions for defined problem. Understanding of social dynamics, unique to problem could be equally important; at the same time you need to see how you can connect those in global context to model problem more effectively.

I think to work innovatively to provide required effective solutions, one needs to be enough flexible and can extend approach in predictive manner to understand unidentified, implicitly inherited attributes of problems by painting its complexity on little broad canvas.